पिंपरी -पवना धरणात पाणीसाठा असतानाही तीन वर्षांपासून भाजप सत्ताधार्यांच्या निष्क्रीय आणि भ्रष्ट कारभारामुळे पिंपरी-चिंचवडकरांवर पाण्यासाठी आक्रोश करण्याची वेळ आली आहे. केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलन करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमधील पाणीटंचाईची जबाबदारी स्वीकारून शहरवासियांची माफी मागावी, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले आहे.
भारतीय जनता पक्षाने औरंगाबाद येथे काढलेल्या जलआक्रोश मोर्चावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी टीका केली आहे. याबाबत त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, भाजपने औरंगाबाद येथे केलेले आंदोलन हे हास्यास्पद ठरले आहे. ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता आहे त्यातील अनेक ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश सुरू आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही अशीच स्थिती आहे. आमची महापालिकेत सत्ता असताना शहरात कधीही पाणीटंचाई निर्माण झाली नाही. योग्य नियोजन आणि चांगल्या पाणीपुरवठ्यासाठी केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला होता.