मुंबई: हे सरकार चुकीच्या पत्राच्या आधारे गठित झाल्यामुळे बेकायदेशीर आहे. या सरकारकडे बहुमत नाही. राष्ट्रवादीचे जे पाच आमदार संपर्कात नव्हते त्यापैकी दोघांनी संपर्क केला असून तिसराही सोशल मीडियावरील व्हिडियोमार्फत संपर्कात आलेला आहे. संध्याकाळपर्यंत सगळे आमदार परत येतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
मलिक म्हणाले, सुप्रीम कोर्टात या खोट्या सरकारविरोधात याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी सोमवारी होणार आहे. हे अल्पमतातील सरकार बरखास्त करण्याची आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता पाळून राजीनामा द्यायला हवा.
सुप्रीम कोर्टात या खोट्या सरकारविरोधात याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी सोमवारी होणार आहे. हे अल्पमतातील सरकार बरखास्त करण्याची आमची मागणी आहे. @Dev_Fadnavis यांनी नैतिकता पाळून राजीनामा द्यायला हवा.
– @nawabmalikncp— NCP (@NCPspeaks) November 24, 2019