मुंबई : देशात सध्या राजकीय उलथापालथ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण देहासाचे राजकारण बदलण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, या सर्व परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपा त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांनाच संपवतो, असा खळबळजनक आरोप शरद पवार यांनी केला आहे.
पंजाबमधील शिरोमणी अकाल दलाचे उदाहरण देत अकाली दलाला भाजपनेच संपवल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, “प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाही आणि आमचा एकच पक्ष देशात शिल्लक राहील, असं विधान भाजपाकडून करण्यात आलं. यातून नितीश कुमार यांनी केलेली तक्रार स्पष्ट होते.”
अशातच पवारांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “कमी आमदार असतानाही आम्ही शिवसेनाला मुख्यमंत्रीपद दिलं असून मुळात शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे, ते आपल्याला माहिती आहे”, असे ते म्हणाले.