मुंबई – राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचावर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिला आहे. कोणताही विलंब न करता उद्याच पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करून बहुमत चाचणी घेण्यात यावी. व बहुमत चाचणी गुप्त मतदान पद्धतीने न करता त्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे भाजपासमोर उद्याच बहुमत सिद्ध करण्याच आव्हान असणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
बच्चू कडू म्हणाले कि, देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी अमेरिकेतून आमदार आणावे लागतील, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांनी समाधान व्यक्त केले आहे. सत्यमेवा जायते अशी प्रतिक्रिया महाविकासआघाडीच्या नेत्यांनी दिली आहे.