मुंबई – मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचीच खाती तर ऍक्सिस बॅंकेत वर्ग केलीच. याशिवाय एसआरए प्रकल्पातील विकासकांची खाती देखील वरळी येथील ऍक्सिस बॅंकेच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश दिले होते, असा खळबळजनक आरोप मुंबइ कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला. त्यासाठी लाखमोटलाच्या दंडाची नोटीसही त्यांनी विकसकांना काढली होत,अिसा दवाही त्यांनी केला.
फडणवीस यांनी 15 फेब्रुवारी 2016ला खाते उघडण्याचे आदेश काढले. ही खाती विकासकांनी वर्ग न केल्यास त्यांना 15 फेब्रुवारी 2016 ते 28 फेब्रुवारी 2016 च्या दरम्यान दिवसाला एक लाख रुपये दंड आणि त्यानंतर प्रतीदिन प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाचे आदेश दिले. हे आदेश कशाच्या आधारावर दिल्याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही जगताप यांन दिले.
पोलिसांची खाती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बायकोच्या बॅंकेत कशाचा आधारावर वर्ग केली, असा सावाल जगताप यांनी केला होता. त्याला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर भाई जगताप यांनी “खरं किती टोचतं हे अमृता फडणवीस यांच्या भाषेवरून समोर आलं’, असा टोला लगावला.
“ऍक्सिस बॅंकेचे खाते वर्ग करण्याचे आदेश हे आघाडी सरकारच्या काळात देण्यात आले होते, असेअमृता फडणवीस यांनी म्हटले आहे 2005 मध्ये आघाडी सरकारने 16 बॅंकांमध्ये पोलिसांची खाती वर्ग करण्याचे निर्णय झाले. मात्र त्याची अंमलबजावणी हे 2016 मध्ये झाली. त्यावेळी फडणवीस मुख्यमंत्री होते. आम्ही निर्णय घेताना 16 बॅंकांचे पर्याय दिले. 2016 मध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करताना 16 बॅंकेचा पर्याय नव्हता. त्यावेळी केवळ ऍक्सिस बॅंकेमध्ये खाती वर्ग करण्यात आली. माझा सवाल तोच आहे केवळ ऍक्सिस बॅंकच का? अन्य बॅंका का नाहीत? आणि दुसरा सवाल असा ही खाती कशाच्या आधारावर वर्ग केली?, असे सवालही भाई जगताप यांनी उपस्थित केले आहेत.
व्यवहारारतील दलाल आज भाजपाचे दलाल
नाना पटोले यांनी मागणी केली की, फडणवीस सरकारमध्ये आरएसएसच्या लोकांना किती वाटा मिळायचा याची चौकशी व्हायला हवी. माझा या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे. कारण फडणवीस यांच्या काळात जे काही घोटाळे झाले, त्या घोटाळेबाजांना देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिली होती. त्यावेळी झालेला चिक्की घोटाळा, सिडको घोटाळा यामध्ये दोन हजार 700 कोटी रुपयांची जमीन ही केवळ 3 कोटीला विकण्यात आली होती आणि या व्यवहारात जे दलाल होते ते आता भाजपचे आमदार आहेत. याची चौकशी व्हायला हवी. भाजपने राज्यपालांची भेट घेतली हे माध्यमांमधून पाहिलं. राजभवन हे सध्या भाजपचा अड्डा झाला आहे. यामुळे राज्यपाल पदाचं पावित्र्य हे सध्याच्या राज्यपालांनी घालवलं आहे, असेही जगताप म्हणाले.