मुंबई: राज्य सरकारने निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानग्रस्तांसाठी जाहीर केलेली मदत ही अत्यंत तोकडी आहे. कोकणासाठी किमात सात ते साडेसात हजार कोटींचे पॅकेज द्यावे. तरच कोकण पुन्हा उभारता येईल, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
फडणवीस म्हणाले, सरकारने जाहीर केलेली मदत ही अत्यंत तोकडी आहे. आम्ही सातत्याने सांगत आहोत की नुकसान अत्यंत मोठे आहे. सरकारसमोर मागील वेळेला कोकण आणि कोल्हापूरसाठी केलेली मदत त्यांच्यासमोर आहे. आम्ही चालू कर्ज माफ केली होती. त्याच्या तीन पट पैसे दिले होते.
आता फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यावेळी आपण पिकालाही तीन पट पैसे दिले होते. ते असं भरून काढता येणार नाही. त्यासाठी आपल्याला झाडांचा विचार करून पैसे द्यावे लागेल. आता सरकारने सर्व मिळून फक्त दीड लाख दिले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.