मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी मिळून राज्यात नवीन महाविकासआघाडी निर्माण केली. त्यामुळे भाजपवर सर्वाधीक आमदार असूनही विरोधात बसण्याची नामुष्की आली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी शपथ घेताच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लढाई सुरु केली असून महाविकासआघाडीच्या किमान-सामना कार्यक्रमावर टीका केली आहे.
फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!
महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे.
नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 28, 2019