मुंबई – गेल्या काही दिवसांपासून व्हाॅट्सअॅपवर एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यामध्ये टाटा ग्रुपच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त कार जिंकण्याची संधी असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत टाटा ग्रुपने स्पष्टीकरण दिले असून हे सर्व खोटे असल्याचे सांगितले आहे.
‘टाटा ग्रुप सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या कुठल्याही अपप्रचारासाठी जबाबदार राहणार नाही. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका आणि ती लिंक इतरांना पाठवू नका’, अशी माहिती टाटा ग्रुपने ट्वीट करून दिली आहे.
#FakeNotSafe
Tata Group or its companies are not responsible for this promotional activity. Please do not click on the link and/or forward it to others.Know more here: https://t.co/jJNfybI9ww pic.twitter.com/AA38T0oqHn
— Tata Group (@TataCompanies) October 1, 2021
काय आहे व्हायरल मेसेज ?
गेल्या काही दिवसांपासून व्हाॅट्सअपवर एक मेसेज व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टमध्ये टाटा समुहाच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना विजयी झाल्यास कार बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. या व्हायरल मेसेजसोबत एक लिंकही देण्यात आली आहे. मात्र, टाटा ग्रुपकडून हे सर्व खोटे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्यापर्यंत ही लिंक पोहोचली असेल तर त्यावर क्लिक करून नये किंवा इतरांना पाठवू नये. कुठल्याही अमिषाला बळी पडू नये.