औरंगाबाद – दुष्काळग्रस्त मराठवाड्यात यंदा 1041.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी मान्सूनमध्ये मराठवाड्यात 679.5 मिमी पावसाची नोंद होत असते. त्यापेक्षा यंदाचा पाऊस खूपच जास्त प्रमाणात झाला आहे. अजूनही मराठवाड्याचील काही भागांमध्ये पर्जन्यवृष्टी सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मराठवाड्यात आतापर्यंत 153.27 टक्के पावसाची नोंद झाली आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
मराठवाड्यात गेल्या चार महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 91 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 लेख हेक्टर वरील शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.
मराठवाड्यात औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड, जालना आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. शुक्रवारी आणी शनिवारी या 8 पैकी 4 जिल्ह्यांमधील काही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या विहामद्वा परिक्षेत्रात गेल्या 24 तासात सर्वाधिक 107.25 मिमी पावसाची नोंद झाली आहे, असे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शुक्रवारपासून औरंगाबाद, बीड, जालना आणि परभणी जिल्ह्यातील 12 मंडळांमध्ये 65 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. परभणीमध्ये टाकळी-कुंभकामा, कुप्ता आणि सोनपेठ येथाही तुरळ पाऊस झाला आहे. जायकवाडी धरणात 99.06 टक्के जलसाठा झाला आहे. या धरणातून 9,432 क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. आतापर्यंत गोदावरी नदीमध्ये एकूण जायकवाडी धरणातून 28,296 क्युसेक विसर्ग झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.