नवी दिल्ली – उत्सवाच्या काळात डाळींच्या किमती वाढू नयेत. त्याचबरोबर पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता केंद्र सरकारने काही डाळींच्या आयातीवर वरील शुल्क कमी केले होते. आता 31 डिसेंबरपर्यंत विनाशुल्क या डाळी आयात करता येणार आहेत. अगोदर मे महिन्यामध्ये केंद्र सरकारने मर्यादित काळासाठी डाळीवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता.