नवी दिल्ली – करोना व्हायरसमुळे केंद्र सरकारने विमान कंपन्यांना तिकिटाच्या कमाल दरावर मर्यादा आणल्या होत्या. याची मुदत 24 नोव्हेंबर रोजी संपत होती. मात्र, आता आणखी तीन महिने कमाल दरावर मर्यादा राहणार आहेत.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले की, 21 मे रोजी केंद्र सरकारने 24 ऑगस्टपर्यंत विमान तिकीट दरावर मर्यादा जाहीर केल्या होत्या. नंतर त्यात 24 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. परिस्थितीचा आढावा घेऊन आता त्यामध्ये आणखी तीन महिने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यानच्या काळामध्ये परिस्थिती सुधारली तर दरावरील नियंत्रणे काढून टाकली जातील, असे त्यांनी सांगितले.
……….