पिंपरी – शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) 25 टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेसाठी 24 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही शेवटची मुदतवाढ असून एसएमएस मिळालेल्या पालकांनी त्वरित प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.
तिसऱ्या फेरीची ऑनलाइन सोडत काढण्यात आली आहे. यापूर्वी प्रवेश घेण्यासाठी 18 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, बहुतांश विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश घेतले नाहीत. त्यामुळे 24 जुलैपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहेत.