लोणी काळभोर (वार्ताहर) – वयस्कर विवाह इच्छुक तरुनांची टोळीमधील महिलांच्या सोबत बनावट लग्ने लावुन, विवाह इच्छुक तरुनांची आर्थिक फसवणुक करणाऱ्या महिलांच्या टोळीचा जिल्हा (ग्रामिन) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. ज्योती रविंद्र पाटील ( वय- ३५, रा. केसनंद फाटा वाघोली, ता. हवेली) ही टोळीची प्रमुख असुन, पोलिसांनी ज्योती पाटील हिच्यासह सहा महिला व दोन पुरुष अशा नऊ जनांना अटक केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख, पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.
पोलिसांनी टोळीप्रमुख ज्योती पाटील हिच्यासह महानंदा तानाजी कासले ( वय ३९, रा. काळे पडळ, हडपसर), रूपाली सुभाष बनपटटे (वय- ३७ ), कलावती सुभाष बनपटटे ( वय- २५ ), सारिका संजय गिरी (वय- ३३, रा. वरील तिघीही, वडारवाडी, पुणे ), स्वाती धर्मा साबळे (वय- २४, रा. भेकराई नगर, फुरसुंगी ता. हवेली), मोना नितीन साळुके (वय- २८, रा. मांजरी महाराष्ट्र बॅके जवळ मांजरी बुद्रुक ता. हवेली), पायल गणेष साबळे (वय- २८, रा. गडद ता.खेड ) या सात महिलांच्यासह या टोळीस विवाह इच्छुक तरुनांची ओळख करुन देणाऱे दिगंबर जगन्नाथ भामरे ( वय. २९, रा. मांजरी बुद्रुक ता. हवेली ) व सतीश रंगनाथ झामरे ( वय. ३०, रा. धायरी, पुणे ) अशा नऊ जनांना पोलिसांनी अटक केली आहे. वरील आरोपींच्या विरोधात गणेष अर्जुन सावळे (वय- ३२, रा. दिवड, ता. मावळ) या तरुनाने वडगांव मावळ पोलिसात फसवणुकीची तक्रार दिली आहे.
पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली परीसरात राहणारी ज्योती पाटील ही महिला दिगंबर भामरे व सतीश झामरे या दोघांच्या मदतीने लग्न जमत नसलेल्या विवाह इच्छुक तरुनांची माहिती गोळा करत असे. वरील माहितीच्या आधारे विवाह इच्छुक तरुनांबरोबरोबर संपर्क साधुन, संबधित तरुनांना दोन ते तीन लाख रुपयांच्या बदल्यात मुलगी मिळवुन देण्याचा व्यवहार करत होती.
ज्योती पाटील हिने ठरवलेल्या लग्नातील नवविवाहीता नवऱ्याच्या घऱी सात ते आठ दिवस राहुन, ठरलेल्या कटाप्रमाणे माहेरी जाण्यासाठी निघुन जात होती. त्यानंतर नवऱ्यांला अथवा त्याच्या घऱच्यांना पोलिसांची भिती दाखवुन गप्प करत होती. अथवा नवविवाहीता घरात कोणी नसल्याचे पाहुन कटात ठरल्याप्रमाने नवऱ्य.ाच्या घरातील पैसे व दागदागिणे घेवुन पळुन जात होते. अशाच पध्दतीने ज्योती पाटील व तिच्या वरील सहकाऱ्यांनी अऩेक तरुणांची फसवणुक केली होती. मात्र इज्जतीपोटी अदयाप पर्यत कोणीही त्याचे विरूध्द तक्रार दिलेली नव्हती.
मात्र ज्योती पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी जानेवारी महिण्याच्या २१ तारखेला तीन लाख रुपयांच्या बदल्यात गणेष सावळे या तरणाचे लग्न, टोळीतील विदया सतिश खंडाळे (वय- २७, रा. पद्मावती, कात्रज, धनकवडी ) या नावाच्या तरुणींशी लावुन दिले होते.
लग्न जमवतांना ज्योती पाटील हिने विद्या खंडाळे हीचे नाव सोनाली मच्छिद्र जाधव ( रा. मालगांव, ता.मालेगांव जि.धुळे ) असे असल्याचे गणेश व त्याच्या नातेवाईकांना सांगितले होते. गणेश बरोबर दिड महिण्यापुर्वी लग्न लावुन दिले असले तरी, प्रत्यक्षात विदया खंडाळे हिला पहिल्या लग्नाची दोन मुलेही आहेत.
लग्नानंतर विद्या खंडाळे गणेशच्या घऱी राहत असली तरी, दिवसभर एका व्यक्तीशी फोनवर सतत बोलत असल्याने, गणेश व त्याच्या घरातील नातेवाईकांना विद्याच्या वागण्यांचा संशय आला. यातुनच विद्याची अधिक माहिती घेतली असता, विद्याकडुन गणेशची फसवणुक झाल्याची बाब नातेवाईकांच्या लक्षात आली.
यावर गणेश व त्याच्या नातेवाईकांनी पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची भेट घेऊन, ज्योती पाटील करत असलेल्या फसवणुकीची माहिती दिली. गुन्हा गंभीर असल्याने, देशमुख यांनीही वरील प्रकरणाची पाळेमुळे खनण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. यावर स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेने ज्योती पाटील हिच्यासह सात महिला, दोन पुरुष व दोन चारचाकी गाड्या ताब्यात घेतल्या.
फसवणुक झालेल्यांनी पुढे यावे – डॉ. अभिनव देशमुख..
याबाबत बोलतांना पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, ज्योती पाटील व तिच्या सहकाऱ्यांनी गणेश सावळे याच्याप्रमाने जिल्हातील अऩेक विवाह इच्छुक तरुनांची बनावट लग्ने लावुन आर्थिक फसवणुक केली असण्याची शक्यता आहे. वरील आरोपींच्याकडुन फसवणुक झालेल्यांची नावे शोधण्याचे काम पोलिस करत आहेत. मात्र ज्या ज्या लोकांची फसवणुक झालेली आहे, अशा सर्व लोकांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा अथवा वडगांव मावळ पेालीस स्टेसनशी संपर्क साधावा.