नवी दिल्ली – ऑगस्ट महिन्यामध्ये भारतातून होणारी निर्यात 46 टक्क्यांनी वाढून ती 33 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये 23 अब्ज डॉलरची निर्यात झाली होती.
ऑगस्ट महिन्यामध्ये आयात 51 टक्क्यांनी वाढून 47 अब्ज डॉलर झाली आहे. त्यामुळे व्यापारातील तूट 14 अब्ज डॉलरवर गेली आहे. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान निर्यात 67 टक्क्यांनी वाढून 164 अब्ज डॉलर झाली आहे. तर आयात 219 अब्ज डॉलरची झाली आहे. आगामी काळात निर्यात वाढविण्यासाठी भारताने महत्त्वाकांक्षी उपाय योजना केल्या आहेत.