नवी दिल्ली – स्वातंत्र्यानंतर एकसंध भारताच्या रचनेत मोलोचे योगदान देणारे व्ही.पी. मेनन यांच्यावरील नवीन पुस्तक या महिन्याच्या अखेरीला बाजारात येत असून त्यातून अनेक ऐतिहासिक महत्वाच्या घडामोडींचा उलगडा होणार आहे असे या पुस्तकाच्या प्रकाशक कंपनीने म्हटले आहे. प्रसिद्ध इतिहास लेखक आणि मेनन यांच्या पणती-नात असलेल्या नारायणी बसू यांनी हे पुस्तक लिहीले आहे. व्ही पी मेनन : द अनसंग आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया असे या पुस्तकाचे नाव आहे. व्ही. पी. मेनने हे भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांचे राजकीय सल्लागार होते.
या पुस्तकात मेनन यांच्याशी संबंधीत अनेक महत्वाच्या घडामोडींचा तपशील देण्यात आला आहे. त्यात अनेक खासगी महत्वाच्या प्रसंगांचाही उल्लेख असणार आहे.
मेनन यांनी त्या काळात जपलेले रेकाडॅ आणि नोंदींच्या आधारे हे पुस्तक बनवण्यात आल्याने ते बहुतांशी खात्रीशीर आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या वेळच्या अनेक महत्वाच्या व पडद्या मागच्या घटनांचा आढावा यात सादर करण्यात आल्याने अनेक बाबींचा उलगडाही यातून होणार आहे.
भारताला स्वातंत्र्य देण्याविषयी ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडीतून देशाला स्वातंत्र्य देताना नेमक्या कोणत्या योजना तत्कालिन प्रशासनाने अंगीकारल्या होत्या व त्या मागचे नेमके धोरण काय होंते याची माहिती मिळणार आहे. भारतात महिलांना मताधिकार देण्याच्या प्रस्तावाचे ते मोठे समर्थक होते. त्यांनी हा अधिकार महिलांना देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यावेळी अस्तित्वात असलेली संस्थाने भारतात सामील करून घेण्याच्या घडामोडींचेहीं मेनन हे साक्षीदार आहेत. त्याचाहीं रंजक इतिहास या पुस्तकातून उलगडला जाणार आहे.