पुणे – दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्राय किमान कॉल आणि डेटा दर जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कमी ग्राहक असलेल्या बीएसएनएलसारख्या कंपन्यांना सवलत मिळण्याची गरज असल्याचे या कंपनीने म्हंटले आहे.
बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन सरकारी कंपन्यांनी यासंबंधातील एक निवेदन ट्रायला सादर केले आहे. किमान दर बाजारपेठेचा 15 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त हिस्सा असलेल्या कंपन्यांनाच लागू करावेत असे सूचवले आहे.
जर हे दर 15 टक्क्यांपेक्षा कमी ग्राहक असलेल्या कंपन्यांना लागू केले तर या कंपन्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. बीएसएनएलचा बाजारपेठेतील हिस्सा केवळ 10.3 टक्के तर, एमटीएनएलचा 0.29 टक्के आहे. रिलायन्स जिओचा हिस्सा 32.15 टक्के, भारती एअरटेलचा हिस्सा 28.42 टक्के, वोडाफोनचा हिस्सा 28.89 टक्के इतका आहे.