नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना मतमोजणीच्या आदल्या दिवशी अत्यंत जागरूक राहण्याचा इशारा दिला आहे. नुकत्याच जाहीर झालेले एक्झिट पोलचे निकाल बोगस (फेक) आहेत असे त्यांनी म्हटले आहे. घाबून जाऊ नका तुम्ही सत्याची लढाई करीत आहात, स्वतावर आणि कॉंग्रेस पक्षावर विश्वास ठेवा. तुमचे कष्ट वाया जाणार नाहींत असेही राहुल गांधी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
असाच संदेश काल त्यांच्या भगिनी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दिला होता. त्यांनीही कार्यकर्त्यांना आपल्या मतमोजणी केंद्रांवर ठामपणे उभे राहण्याचा सल्ला दिला होता. एक्झिट पोलचे निकाल जाहींर होऊन तीन दिवस झाल्यानंतर मतमोजणीच्या आदल्या दिवसा पर्यंत राहुल गांधी यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नव्हती. त्यांना आज संदेशाच्या रूपात ही पहिली प्रतिक्रीया दिली आहे.