नवी दिल्ली : देशातील कोरोनाची परिस्थिती ही अत्यंत विदारक होत असल्याचे चित्र आहे. त्यातच देशातील अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत तर कुठे रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. दरम्यान, काही राज्यांमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम सुरु आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यासाठी सभा घेण्यात येत असून त्यामुळे गर्दी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे.
‘सिस्टम’ फ़ेल है इसलिए ये जनहित की बात करना ज़रूरी है:
इस संकट में देश को ज़िम्मेदार नागरिकों की ज़रूरत है। अपने कांग्रेस साथियों से मेरा अनुरोध है कि सारे राजनैतिक काम छोड़कर सिर्फ़ जन सहायता करें, हर तरह से देशवासियों का दुख दूर करें।
कांग्रेस परिवार का यही धर्म है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 25, 2021
राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना एक आदेश दिला आहे. ज्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना काँग्रेस धर्माची आठवण करून दिली आहे. याविषयी त्यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी देशातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केले आहे. सिस्टम फेल झाली आहे त्यामुळे जनहितार्थची गोष्ट करणे गरजेचे असल्याचे म्हटलं आहे. या संकटाच्या काळात जबाबदार नागरिकांची देशाला गरज आहे. त्यामुले मी माझ्या काँग्रेसच्या सहकाऱ्यांना विनंती आहे, सर्व राजकीय कार्यक्रम सोडून देशातील जनतेला मदत करा. देशातील जनतेचे दुःख दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा,काँग्रेस परिवाराचा हाच धर्म आहे”. असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी काही दिवसापूर्वीच आपल्या सर्व राजकीय सभा रद्द केल्या होत्या. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले होते.