मुंबई – झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी ‘रात्रीस खेळ चाले 2’ ही मालिका महाराष्ट्रातील घराघरांत पहिली जाती. या मालिकेत बऱ्याच घडामोडी होतच असतात. मालिकेमध्ये अनेक रहस्यमय घटना समोर येत असतात. त्यामुळे ‘रात्रीस खेळ चाले 2’ ही मालिका पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढते.
दरम्यान, आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली असून लवकरच अण्णा नाईक आणि सौंदर्यवती शेवंता लगीनगाठ बांधणार आहेत. त्यामुळे नाईक वाड्यावर एकच खळबळ उडाली आहे. अण्णा नाईकांशी लग्न करुन शेवंता आता नाईक वाड्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
View this post on Instagram
मात्र शेवंता आता नाईक वाड्यात प्रवेश करणार का? की अण्णा नाईक केवळ तिला झुलवत ठेवणार? माई नेमका काय पवित्रा घेणार? याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पाटणकर बाई अर्थात शेवंताची भूमिका साकारत आहे, तर दिग्गज अभिनेते माधव अभ्यंकर अण्णा नाईक यांच्या भूमिकेत आहेत. शकुंतला नरे सोशिक माईची व्यक्तिरेखा साकारतात.