नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सत्ताधारी ‘आप’ 57 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपने 12 जागेपर्यंत मुसंडी मारली आहे. तर कॉंग्रेसचा सुपडा साफ झाल्यातच जमा आहे. याचदरम्यान कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी पक्षाच्या निराशाजनक प्रदर्शनावर आक्षेप घेत पराभवाचे खापर पुन्हा एकदा ईव्हीएमच्या माथी फोडले आहे.
Would CEC and Hon Supreme Court please have a fresh look on EVM voting in India? We are the largest Democracy in the World, we can’t allow some Unscrupulous People to Hack Results and steal the Mandate of 1.3 Billion People.
— digvijaya singh (@digvijaya_28) February 11, 2020
दिल्लीच्या मतमोजणीवर प्रतिक्रिया देताना दिग्विजय सिंह यांनी, ईव्हीएम टेंपर प्रूफ नाही. कोणताही विकसित देश याचा उपयोग करत नाहीत. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. ते म्हणाले की, चिपवाली कोणतीही मशीन टेंपर प्रूफ नाही. कृपया, एक मिनिटासाठी विचार करा की विकसित देश ईव्हीएमचा उपयोग का करत नाहीत? त्यांनी सर्वोच्च न्यायालय तथा निवडणूक आयोगाला ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करण्याचा आग्रह केला आहे.
Would CEC and Hon Supreme Court please have a fresh look on EVM voting in India? We are the largest Democracy in the World, we can’t allow some Unscrupulous People to Hack Results and steal the Mandate of 1.3 Billion People.
— digvijaya singh (@digvijaya_28) February 11, 2020
ते म्हणाले, निवडणूक आयोग आणि माननीय सर्वोच्च न्यायालय भारतात ईव्हीएमवर मतदानाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा विचार करतील का? आपली लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहे, आणि आम्ही काही धोकेबाज लोकांना निवडणुकीचे निकाल हॅक करण्यापासून आणि 1.3 अब्ज लोकांचा जनादेश चोरण्याची परवानगी देऊ शकत नाही. शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली राज्यात तब्बल 15 वर्षे राज्य करणाऱ्या कॉंग्रेसला खाते उघडण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.