नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास केवळ एकच दिवस राहिला आहे. परंतु, त्याआधी विरोधकांनी ईव्हीएम मशीनच्या छेडछाडीवरून रान उठविले आहे. आता या वादात एका काँग्रेस नेत्याने सर्वोच्च न्यायालयालाही खेचले आहे. काँग्रेस नेते उदित राज यांनी सर्वोच्च न्यायालयावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
उदित राज म्हणाले कि, व्हीव्हीपॅटमधील सर्व चिठ्ठ्यांची पडताळणी व्हावी, असे सर्वोच्च न्यायालयाला का वाटत नाही? तेही या गडबडीत सामील आहेत का? निवडणूक प्रक्रियेत तीन महिन्यांपासून सर्व सरकारी कामे मंद पडली असतील तर मोजण्यासाठी दोन-तीन दिवस लागले तर काय फरक पडतो? असे त्यांनी म्हंटले आहे.
सप्रीम कोर्ट क्यों नहीं चाहता की VVPAT की सारी पर्चियों को गिना जाए क्या वो भी धाँधली में शामिल है।चुनावी प्रक्रिया में जब लगभग तीन महीने से सारे सरकारी काम मंद पड़ा हुआ है तो गिनती में दो- तीन दिन लग जाए तो क्या फ़र्क़ पड़ता है @priyankagandhi @INCDelhi @RahulGandhi @PTI_News
— Dr. Udit Raj (@Dr_Uditraj) May 22, 2019
निवडणूक आयोगावर गंभीर टीका करताना उदित राज म्हणाले, भाजपला ज्या-ज्या ठिकाणी ईव्हीएम बदलायची होती. त्या ठिकाणी बदललीही असेल. यासाठीच निवडणूक सात टप्प्यांमध्ये घेण्यात आली. ओरडून कोणीही तुमचे ऐकणार नाही. लिहून काही होणार नाही. यासाठी रस्त्यावर उतरायला पाहिजे. देशाला जर या इंग्रजांच्या गुलामांपासून वाचवायचे असेल तर आंदोलन करायला लागेल. साहेब, निवडणूक आयोगही विकले गेले आहे.
BJP को जहां-जहां EVM बदलनी थी बदल ली होगी इसीलिए तो चुनाव सात चरणों मे कराया गया।
और आप की कोई नहीं सुनेगा चिल्लाते रहिए,
लिखने से कुछ नहीं होगा, रोड पर आना पड़ेगा।
अगर देश को इन अंग्रेजो के गुलामों से बचाना है तो आन्दोलन करना पड़ेगा साहब
चुनाव आयोग बिक चुका है#EVMHacking— Dr. Udit Raj (@Dr_Uditraj) May 21, 2019
दरम्यान, लोकसभा निवडणूकीच्या 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणी दरम्यान “व्हीव्हीपॅट’च्या स्लीपांबरोबर 100 टक्के पडताळणी करण्यात यावी, या मागणीसाठी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका सर्वोच्च न्यायलयाने फेटाळून लावली.