Saamana Editorial: राजकारणात काहीही होऊ शकतं. इथे कोणीही कुणाचा कायमचा मित्र नाही आणि शत्रूही नाही. प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून विधानपरिषदेची उमेदवारी मिळवली. सरकारवर सतत हल्लाबोल करत दिव्यांगासह इतर मागण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या बच्चू कडू यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणे हे मोठी राजकीय घडामोड होती. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता ‘सामना’च्या अग्रलेखातून बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. फडणवीस, मोदींचा जय करीत दिव्यांगांच्या न्यायासाठी भाजपच्या गाडीस लटकण्याचा प्रयत्न करतील. कडू महाराजांची समाधी म्हणजे मंबाजीचे ढोंग आहे, घसरलेल्या राजकीय पातळीचे चित्र आहे. विधान परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठप्राप्तीस निघाले आहेत. दिव्यांग, शेतकरी, विधवा मात्र जेथे होत्या तेथेच आहेत, अशा शब्दांत सामनातून बच्चू कडूंवर जोरदार प्रहार करण्यात आला आहे. कडू महाराज राजकीय वैकुंठप्राप्तीस निघाले आहेत. (Saamana Editorial) भाजप भविष्यातील निवडणुका ‘स्वबळावर’ लढणार आहे. भाजपची गाडी फुल झाली, चढायला जागा नाही. ही गाडी अजित पवारांचा पक्ष व मिंध्यांच्या पक्षाला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात आहे. अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे व उद्या मिंध्यांचे आमदारही भाजपमध्ये जातील. मिंधे रिकामे होतील तेव्हा आताची समाधी अवस्था सोडून कडू महाराजांसारखे लोक भाजपचा भंडारा उधळतील. फडणवीस, मोदींचा जय करीत दिव्यांगांच्या न्यायासाठी भाजपच्या गाडीस लटकण्याचा प्रयत्न करतील. कडू महाराजांची समाधी म्हणजे मंबाजीचे ढोंग आहे, घसरलेल्या राजकीय पातळीचे चित्र आहे. विधान परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठप्राप्तीस निघाले आहेत. दिव्यांग, शेतकरी, विधवा मात्र जेथे होत्या तेथेच आहेत. ….त्यामुळे समाधी अवस्थेत कडू यांना देव दिसला. अमरावती विभागात बराच काळ आमदार व मंत्री असलेले श्रीमान बच्चू कडू यांनी स्वतःला मिंधे गटात विलीन करून जिवंत समाधी घेतली. या समाधी सोहळ्यास स्वतः उपमुख्यमंत्री मिंधे व कडू यांचे अनुयायी हजर होते. कडू यांचा हा समाधी व समर्पणाचा सोहळा आटपल्यावर त्यांचा राजकीय वैकुंठाचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी त्यांचे नवे गुरू महाराज मिंधे यांनी कडू महाराजांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यामुळे समाधी अवस्थेत कडू यांना देव दिसला. कडू हे विधानसभा निवडणूक हरले तेव्हापासून ते पाण्याबाहेर पडलेल्या माशाप्रमाणे तडफडताना दिसत होते, अशी बोचरी टीकाही करण्यात आली आहे. (Saamana Editorial ) कडू हे समाजसेवेचा बुरखा पांघरून राजकारण करणारे व स्वार्थ साधणारे व्यक्तिमत्त्व पुढे अग्रलेखात कडूंच्या राजकीय वाटचालीवर भाष्य करण्यात आले आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याची ही तडफड समाजाला अस्वस्थ करणारी आहे. कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चे काढले, आंदोलने केली. दिव्यांगांच्या, वंचितांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवला. त्यांच्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते महाराष्ट्रात काम करीत होते. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते, पण मिंधे गट फुटला व सरकार पडले तेव्हा हा ‘सेवाभावी’ कार्यकर्ता सुरत, गुवाहाटी, गोवा अशी तीर्थयात्रा करून महाराष्ट्रात परतला व गंगेत डुबकी मारून आल्याचा आनंद घेत सरकारदरबारी फिरत राहिला. त्यामुळे लोकांना त्यांचे खरे रूप दिसले. कडू हे समाजसेवेचा बुरखा पांघरून राजकारण करणारे व स्वार्थ साधणारे व्यक्तिमत्त्व आहे, असल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Saamana Editorial ) पुन्हा ‘आमदार’ म्हणून प्राणज्योतीचा दिवा पेटवला. अशा लोकांचा भरणा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वाढला आहे, असल्याचा कडू हे त्यांचे मार्गदर्शक, आदर्श म्हणून पुढे आले. आपण मूळचे शिवसैनिक असल्याचे ते सांगतात, पण शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून मोठ्या सेवाभावी वृत्तीने त्यांनी तेव्हा सोडले. ते निधर्मी झाले. लोकांनी त्यांना बिनपक्षाचे उमेदवार म्हणून निवडून दिले. त्यानंतर ते फडणवीस, मोदी यांच्या भूमिकेवर टीका करीत राहिले व महाविकास आघाडीत मंत्रीपदाची शिदोरी मिळवली. कोविड काळानंतर सत्ताबदलाची चाहूल लागताच अपंग, शेतमजुरांच्या कल्याणासाठी त्यांनी मिंध्यांची भलामण सुरू केली. ही भलामण करूनही मंत्रीपद मिळाले नाही तेव्हा पुन्हा सरकारवर टीका सुरू केली. उपोषणे, आंदोलने सुरू केली. कडू महाराज 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हरले. त्यांची आमदारकीची वस्त्रे जनतेने उतरवली तेव्हापासून त्यांची तडफड सुरू होती. आता या तडफडणाऱ्या आत्म्याने शरीरावर नवीन वस्त्रे परिधान करून मिंधे पक्षात प्रवेश केला व पुन्हा ‘आमदार’ म्हणून प्राणज्योतीचा दिवा पेटवला, अशा शब्दांत टीका केली आहे. संघर्ष म्हणजे जनतेला मूर्ख बनविण्याचे धंदे. ‘आमदारकी’साठी कडू महाराजांनी घेतलेली ही समाधी म्हणजे समाजकारणाच्या नावाखाली सुरू असलेल्या ढोंगाचा पर्दाफाश आहे. यापुढे कडू महाराज हे मिंध्यांची ताकद वाढविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहेत. मात्र त्याआधी त्यांचे विधान होते की, ‘‘आम्ही मिंध्यांसोबत आमदारकीसाठी जाणार नाही. आमदारकीसाठी मिंध्यांसोबत जाण्याएवढे आम्ही नालायक नाही.’’ कडू महाराजांनी हे दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. आज त्याचा त्यांना विसर पडला आणि ते ‘मिंधेवासी’ झाले. अमरावतीत ‘बच्चू कडू विरुद्ध रवी राणा’ असा संघर्ष आहे. दोन ‘नौटंकी’मधला हा संघर्ष म्हणजे जनतेला मूर्ख बनविण्याचे धंदे आहेत. राणा यांना भाजपने उमेदवारी दिली तेव्हा ही ‘लाचारी’ असल्याची टीका कडू यांनी केली. मग आता कडू महाराजांनी जी समाधी घेतली ती समजायची? असा सवालही उपस्थित केला आहे. आता खुद्द कडू महाराजच मिंध्यांच्या गुलाब सेनेत विलीन झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या घरावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. यावर ‘‘हिंमत असेल तर मोर्चा काढून दाखवा’’ अशी आव्हानाची भाषा मंत्री गुलाबराव पाटलांनी केली. पुढे हा मोर्चा काही निघाला नाही व आता खुद्द कडू महाराजच मिंध्यांच्या गुलाब सेनेत विलीन झाले. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणाचे हे विचित्र स्वरूप आहे. आमदारकी नसेल तर काम करता येत नाही, कार्यकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करता येत नाहीत असे कडूंचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या, दिव्यांगांच्या, विधवांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे आपण मिंधे यांच्याशी हातमिळवणी केली असे खुलासे कडू महाराज करीत आहेत, पण त्यांची पुरती बेअब्रू समाधी प्रकरणात झाली, असेही अग्रलेखात म्हटले आहे. हेही वाचा : Pooja Hegde: जीव धोक्यात घालून ‘रेट्रो’ची शूटिंग; पूजाने सांगितले सेटवरील हादरवणारे अनुभव