कोल्हापूर – राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या कोट्यातून राजू शेट्टी यांचे नाव बाजूला गेल्याच्या चर्चे नंतर स्वतः राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधान परिषद हे साधन नाही… आमदारकी नाही मिळाली म्हणून आमच्याकडे 10-20 लोक आत्महत्या करतील अस काही नाही. प्रत्येकाच्या वेळा येत असतात त्या वेळेस आपण ठरवू काय करायचं ते मात्र त्यावेळेस एकेकाचे हिशोब चुकते करू त्यासाठी मी समर्थ आहे असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलाय. ते कोल्हापूरच्या चिंचवाड गावात पत्रकारांशी बोलत होते.
शेट्टी म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वी समझोता झाला होता. त्यानुसार एक विधान परिषदेत जागा स्वाभिमानीला मिळणार एवढेच ठरलं होतं. मग त्यासाठी एवढी चर्चा कशासाठी आणि आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणून आमच्यावर मेरबानी आणि दया कोणी करत नाही. आम्ही राजकारण करतो ते चळवळ मजबूत करण्यासाठी. राजकारण हे आमचं साधन आहे. हे आमचं साध्य नाही आणि भविष्यातही असणार नाही, अस शेट्टी यांनी नमूद केलं.
आम्हाला फारसा फरक पडत नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या वेळा येत असतात. त्या वेळेस आपण ठरवू काय करायचं ते.. मात्र वेळ आल्यास एकेकाचे हिशोब चुकते करू… त्यासाठी मी समर्थ आहे अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिलाय.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या रखडलेल्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिष्टमंडळाने नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यानंतर आता राष्ट्रवादीच्या कोट्यातून संधी मिळालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा पत्ता कापला गेल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. त्यांच्या जागी माजी आमदार हेमंत टकले यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.