मुंबई : राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच ठिकाणी मतदान पार पडत आहे. त्यात राज्यातील अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मुंबईतदेखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीदेखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे आवाहन केले.
शरद पवार यांनी सोमवारी सकाळी मुंबईमध्ये मतदानाचा हक्क बजावला. मतदान करून बाहेर आल्यावर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मतदार नक्कीच सदसदविवेकबुद्धीला स्मरून मतदान करतील, असा विश्वास देखील शरद पवार यांनी व्यक्त केला.
तसेच मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. लोक नक्की घरातून बाहेर पडून मतदान करतील. मतदान हा लोकशाहीचा उत्सव आहे. उत्साहाने लोकांनी मतदान केले पाहिजे. मला असा विश्वास आहे की लोक सदसदविवेकबुद्धिला स्मरून मतदान करतील, असा मला विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्यासोबत त्यांचे जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे हे सुद्धा मतदानाला जाताना उपस्थित होते.