बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने लॉकडाऊननंतर जवळपास चार महिन्यांनंतर शूटिंगच्या सेटवर पाऊल ठेवले आहे. यावेळी तो म्हणाला की, या नवीन परिस्थितीशी आता सर्वांनी जुळवून घेतले पाहिजे. तसेच सेटवर विशेष खबरदारी घेत नवीन वस्तुंचा वापर केला पाहिजे.
अर्जुन म्हणाला, मला वाटतं आपल्यातील प्रत्येकाने या नवीन गोष्टींना धैर्याने सामोरे जावे आणि हळूहळू आपले जीवन पुन्हा सुरू केले पाहिजे. आता काही गोष्टी कायमस्वरूपी बदलल्या आहेत आणि आपण हा बदल स्वीकारून काम करत राहिले पाहिजे. म्हणूनच प्रत्येकाने आपला परिसर सुरक्षित ठेवला पाहिजे.
सध्या अर्जुन आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या अभिनेत्याने सांगितले की, व्यावसायिक शूटच्या सेटवर सुरक्षेचे पुरेसे उपाय केले गेले आहेत. मी 4 महिन्यांनंतर प्रथमच शूट केले आहे. सुरुवातीला मी या परिस्थितीबद्दल किंचित अस्वस्थ होतो. परंतु सेटवरील सर्व सुरक्षा उपाय पाहिल्यानंतर मला खात्री पटली. दरम्यान, अर्जुनने आगामी काळात अनेक शूटच्या डेटस् निश्चित केलेल्या आहेत. तो म्हणाले की, पुन्हा काम सुरू करताना छान वाटले आणि मी पुढच्या शूटच्या प्रतीक्षेत आहे.