नवी दिल्ली – विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी हिंदूंनी कमीत कमी तीन मुले जन्माला घालावीतच असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या वक्त्यव्याने मोठा वाद उफाळून आला आहे.
खांडवा येथील जुन्या धान्य मार्केट जलेबी चौकात होणाऱ्या युवक संमेलनातदरम्यान बोलतांना ते म्हणाले,’प्रत्येक हिंदूच्या घरात 2 ते 3 मुले असायला हवीच. देशातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हिंदूची लोकसंख्या कमी झाली तर भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. त्यामुळे देशातील हिंदूंनी अधिकाधिक मुले जन्माला घालायला हवीच.’ असे वादग्रस्त वक्तव्य मिलिंद परांडे यांनी खांडव्यात केले आहे
दरम्यान,सोशल मीडियावर त्यांचा या भाषणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांचा या वादग्रस्त विधानावरून मोठा वाद उफाळून आला आहे.