औरंगाबाद – एकनाथ खडसे भाजप सोडणार असल्याचा रोजच एक नवीन मुहूर्त सांगितला जात आहे, अशी टिप्पणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस सध्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या पूरग्रस्त गावांना भेटी देण्यासाठी आले होते.
खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त जवळपास निश्चित झाला असल्याचे सध्या सांगितले जात आहे, त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना फडणवीस यांना त्यांची प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्यांनी वरील उत्तर दिले.
याविषयावर त्यांनी अधिक भाष्य करण्याचे मात्र टाळले आहे. खडसे हे भाजप सोडून जाणार नाहीत, असा विश्वास भाजप नेत्यांनी वारंवार व्यक्त केला आहे; पण त्यांना रोखण्यात भाजप नेत्यांना अजून यश आलेले नाही. त्यामुळे खडसेंविषयीच्या बातम्या सातत्याने येत राहिल्या आहेत.