मुंबई : ‘आनंद’, ‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘बातों बातों में’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अर्थपूर्ण गाणी लिहून 70 आणि 80 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ गीतकार योगेश गौर यांचे आज सकाळी निधन झाले.
मुंबईतील गोरेगावमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. योगेश नावाने प्रसिद्ध असलेल्या योगेश गौर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते आणि अनेक वर्षांपासून आजारी होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता आणि काही वर्षांपूर्वी त्यांचं किडनीशी निगडीत शस्त्रक्रियाही झाली होती.
Mujhe abhi pata chala ki dil ko chunewale geet likhnewale kavi Yogesh ji ka aaj swargwas hua. Ye sunke mujhe bahut dukh hua.Yogesh ji ke likhe kai geet maine gaaye. Yogesh ji bahut shaant aur madhur swabhav ke insan the. Main unko vinamra shraddhanjali arpan karti hun.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) May 29, 2020
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनही ट्वीट करुन योगेश यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “मनाला भिडणारी गाणी लिहिणाऱ्या योगेशजी यांचं निधन झाल्याचे मला नुकतंच समजले. मला अतिशय दु:ख झालं. योगेशजी यांनी लिहिलेली गाणी मी गायली आहेत. योगेशजी अतिशय शांत आणि मधुर स्वभावाचे व्यक्ती होते. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करते.”
1943 मध्ये उत्तर प्रदेशच्या लखनौ शहरात जन्मलेल्या योगेश यांनी ‘एक रात’, ‘मंजिलें और भी हैं’, ‘आजा मेरी जान’, ‘प्रियतमा’, ‘दिल्लीगी’, ‘पंसद अपनी अपनी’, ‘हनीमून’, ‘अपने-पराये’, ‘लाखों की बात’, ‘किरायेदार’ यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत.