मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातील सरकार यांच्या शेतकरी आंदोलनावरून सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यांच्या टीकेला आता भाजपकडून सडेतोड उत्तर आले आहे.
भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “तुम्ही सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्व सोडले असले तरी लोकांच्या मनात ते जिवंत आहे. त्यामुळे फार चिंता करू नका…” अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात भारतातील राज्यही रशिया सारखी फुटतील…
त्यांना मला सांगावेसे वाटते की हा देश हिंदुत्वाच्या मजबूत धाग्यांनी बांधला गेलाय. तुम्ही सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्व सोडले असले तरी लोकांच्या मनात ते जिवंत आहे. त्यामुळे फार चिंता करू नका…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 27, 2020
“शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात भारतातील राज्यही रशिया सारखी फुटतील…त्यांना मला सांगावेसे वाटते की हा देश हिंदुत्वाच्या मजबूत धाग्यांनी बांधला गेलाय. तुम्ही सत्तेसाठी लाचार होऊन हिंदुत्व सोडले असले तरी लोकांच्या मनात ते जिवंत आहे. त्यामुळे फार चिंता करू नका…” असं भातखळकर यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
“राजकीय साठमारीत आपण जनतेचे नुकसान करतो याचे भान केंद्रातील सत्तेने ठेवले नाही तर रशियातील राज्ये फुटली तसे आपल्या देशात घडायला वेळ लागणार नाही.” असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज रोखठोक सदरातील लेखाद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच राज्यांची सरकारे अस्थिर करण्यात आपले पंतप्रधान विशेष रस घेत असतील तर कसे व्हायचे? असा टोला देखील यावेळी त्यांनी लगावला.