पुणे – केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत विनाशिधापत्रिका धारकांना मे व जून या दोन महिन्यांकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह 5 किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येणार
आहे.
या योजनेअंतर्गत शिधापत्रिका नसलेल्या राज्यातील 70 लाख 1 हजार 638 गरीब व गरजू नागरिकांना लाभ मिळणार असून यासाठी 35 हजार मेट्रिक टन तांदळाचे नियतन दरमहा करावे लागणार आहे.