मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपसोबत जाण्यासाठी केलेल्या एका वक्तव्याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनी प्रकाश आंबेडकर हे लहान डोक्याचे आहेत. त्यांच्याविषयी काय बोलावं? असं म्हणत त्यांच्यावर टीका केली. तसेच राज्यातील नव्या युतीविषयी देखील आपली भूमिका स्पष्ट केली.
प्रकाश आंबेडकर यांनी आज भाजपा आणि संघाविषयी एक वक्तव्य केले होते त्याबाबत विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘उद्धव ठाकरेंची किंचीत सेना आणि वंचित सेना एकत्र झाली आहे. पण या दोघांचं एकत्र येणं महाविकास आघाडीला मान्य नाही. कितीही वंचित आणि किंचीत सेना एक झाली तरीही आम्हाला अडचण नाही. शिंदे-फडणवीस सरकारलाही काही अडचण नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
तसेच पुढे बोलताना बावनकुळे यांनी,महाविकास आघाडीलाही आम्ही टक्कर देऊ शकतो. एवढंच नाही तर प्रकाश आंबेडकर यांनी जे मनुस्मृतीविषयी जे वक्तव्य केलं कारण ते इतक्या लहान डोक्याचे आहेत. भाजपा हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेलं शासन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. तसं भाजपामध्ये सर्वाधिक आदिवासी आणि मागास वर्गांचे कार्यकर्ते आहेत. हे त्यांना कळत नसेल तर काय बोलणार असेदेखील बावनकुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी, ‘आजच्या घडीला कुठलाही पक्ष कुठल्या पक्षाचा शत्रू नाही. टोकाचे मतभेद असू शकतात. आमचे आणि आरएसएस, भाजपाचे टोकाचे मतभेद आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा भाजपा असो ते आजही मनुस्मृती मानतात. आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधातला आहे. भाजपा आणि संघाने जर मनुस्मृती सोडली आणि घटनेच्या चौकटीत राहून काम करणार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहोत असे म्हटले आहे.