मुंबई – समीर वानखेडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मलिकांची खैर नाही अशा शब्दात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी इशारा दिला आहे. ड्रग्ज प्रकरणाच्या कारवाईनंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. यावर सोमय्या यांनी भाष्य केले आहे.
समीर वानखेडेंच्या केसाला जरी धक्का लागला तर मलिकांची…, किरीट सोमय्यांचा इशारा pic.twitter.com/UNr3tDdZ6k
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 23, 2021
किरीट सोमय्या म्हणाले की, शरद पवारांनी स्पष्टता करावी की मलिक हे शरद पवारांच्या वतीने बोलत आहेत की, ठाकरे सरकारच्या वतीन बोलत आहेत. ते ड्रग्ज माफियांचे प्रवक्ते झालेले आहेत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना हे काम दिले आहे का? आणि समीर वानखेडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मलिकांची खैर नाही. असा सवाल करत सोमय्या यांनी मलिक यांना इशारा दिला आहे.