हिंगोली – आज जगभरात आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मात्र खरच आदिवासी बांधवांना सोयी सुविधा मिळतात का..? आजही देशात अनेक आदिवासी बांधव मुख्य प्रवाहापासून, सोयी-सुविधांपासून वंचितच आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील आदिवासी बांधव हे अनेक सोई सुविधा पासून वंचित आहेत. आताही अनेक आदिवासी बांधव जंगलातच राहतात. शेतातील कामे करून आपल्या जिवनाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना अजुनही राहण्यासाठी घर नाहीत, जंगलात तळ्याच्या बाजूला कुडानाच्या झोपड्यात राहवे लागते.
गावात काही कामे मिळत नाहीत म्हणून ऊसतोडीच्या कामाला जातात. फ़क्त पावसाळ्यात ते गावात राहतात. गेल्या महीनाभरापासून सततधार पाऊस पडत आहे. अनेक आदिवासी बांधवांच्या घरात पाणी शिरले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
प्रशासनाच्या वतीने आदिवासी बांधवांना अनेक सोई-सुविधा ऊपलब्ध करून दिल्या आहेत; मात्र ह्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोवचतच नाहीत. त्यामुळे आज जगभरात स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करत आहोत; मात्र अजुनही आदिवासी बांधाव सोई-सुविधापासून वंचितच आहेत.