लंडन : पहिल्या कसोटी सामन्यात वेळेत षटके पूर्ण केली नाहीत यासाठी आयसीसीने भारत व इंग्लंड या दोन्ही संघांना सामना रकमेच्या 40 टक्के रकमेचा दंड केला आहे.
तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या या पहिल्याच मालिकेत खेळत असलेल्या या दोन संघांचे प्रत्येकी 2 गुणही कापण्यात आले आहेत. या दोन संघांतील या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपासूनच यंदाच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नव्या मोसमाचा प्रारंभ झाला.
यातील पहिला सामना अनिर्णित राहिल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 4 गुण देण्यात आले होते. मात्र, या सामन्यात वेळेत षटके पूर्ण करण्यात भारत व इंग्लंडला अपयश आल्याने त्यांचे प्रत्येकी 2 गुण कापण्यात आले आहेत.
या स्पर्धेत प्रत्येक विजयासाठी 12 गुण देण्यात येतात तर प्रत्येक अनिर्णित सामन्यासाठी 4 गुण देण्यात येतात.