बर्मिंगहॅम – भारत आणि इंग्लंड यांच्यातील अपूर्ण कसोटी मालिकेतील शेवटचा सामना एजबॅस्टन मैदानावर खेळवला जात आहे. इंग्लंडने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे.
भारतीय संघ जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली हा सामना जिंकण्याचा किंवा ड्रॉ करण्याचा प्रयत्न करेल. असे झाल्यास भारत 15 वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकेल. दुसरीकडे, इंग्लंडला हा सामना जिंकून मालिका 2-2 अशी बरोबरीत संपवायची आहे.
England have won the toss and elect to bowl first in the 5th Test.
Live – https://t.co/xOyMtKJzWm #ENGvIND pic.twitter.com/HtE6IhjcHq
— BCCI (@BCCI) July 1, 2022
इंग्लंडने गुरुवारीच त्यांच्या प्लेइंग-11ची घोषणा केली होती. त्याचवेळी भारतीय कर्णधार बुमराहने आज प्लेइंग-11 ची घोषणा केली.
इंग्लंडचा संघ – जॅक लीच, पॉट्स, सॅम बिलिंग्स, बेन स्टोक्स (कॅप्टन), एलेक्स लीस, जॅक क्रॉले, ऑली पॉप, ज्यो रुट, जॉनी बेयरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन.
भारतीय संघ – जसप्रीत बुमराह (कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि मोहम्मद.