नवी दिल्ली -मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील बहुप्रतीक्षित केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी झाला. विस्ताराबरोबरच व्यापक फेरबदल झाल्याने मोदी सरकारचा चेहरामोहरा बदलला आहे. विस्तारावेळी तब्बल 43 मंत्र्यांचा शपथविधी झाला. नारायण राणे, सर्वानंद सोनोवाल या माजी मुख्यमंत्र्यांबरोबरच कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह 15 मंत्र्यांना कॅबिनेट दर्जा मिळाला.
ख़राबी इंजन में थी
और बदले डिब्बे गए
केंद्रीय मंत्रिमंडल— Kirti Azad (@KirtiAzaad) July 8, 2021
यावर आता काँग्रेस नेते किर्ती आझाद यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे त्यांनी ट्विट केले आहे की,’ख़राबी इंजन में थी और बदले डिब्बे गए केंद्रीय मंत्रिमंडल’ म्हणजे खराब तर इंजिने होते, पण डब्बे बदलण्यात आले.’ असे म्हणत किर्ती आझाद यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे.
दरम्यान,राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते. विरेंद्र कुमार, अश्वनी वैष्णव, आर.सी.पी.सिंह, पशुपतीकुमार पारस, भुपेंद्र यादव यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर, किरेन रिजीजू, आर.के.सिंह, हरदीपसिंग पुरी, मनसुख मांडवीय, परषोत्तम रूपाला, जी.किशन रेड्डी आणि अनुराग ठाकूर यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळाली. मंत्रिमंडळात 7 महिलांना स्थान मिळाले. त्यामध्ये अनुप्रिया सिंह पटेल, शोभा करंदलाजे, मीनाक्षी लेखी, अन्नपूर्णा देवी, डॉ.भारती पवार, प्रतिमा भौमिक आणि दर्शना जर्दोष यांचा समावेश आहे.
विस्तारावेळी 28 जणांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये राजीव चंद्रशेखर, पंकज चौधरी, सत्यपालसिंह बघेल, भानुप्रतापसिंह वर्मा, ए.नारायणस्वामी, कौशल किशोर, अजय भट्ट, बी.एल.वर्मा, देवसिंह चौहान, अजय कुमार, भगवंत खुबा, कपिल पाटील, डॉ.भागवत कराड, सुभाष सरकार, राजकुमार रंजन सिंह, विश्वेश्वर टुडू, शांतनू ठाकूर, मुंजापारा महेंद्रभाई, जॉन बार्ला, एल. मुरूगन आणि निशिथ प्रमाणिक यांचा समावेश आहे. उत्तरप्रदेशला सर्वांधिक 7 मंत्रिपदे आली आहेत. त्या राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. मंत्र्यांची संख्या 77 झाली.