नवी दिल्ली: अरबी समुद्रातील तौते चक्रीवादळाने महाराष्ट्रासह गुजरातला मोठा फटका बसला आहे. त्यातच समुद्रात ७०७ कर्मचारी असलेले तीन तराफे भरकटले आणि यातील ‘पी-३०५’ तराफा मुंबईपासून समुद्रात सुमारे ३५ सागरी मैल अंतरावर बुडाला. या तराफ्यांवरील कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली होती. त्यात त्यांना वाचवण्यात यश आले. यावेळी त्यांचे अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
आयएनएस कोच्ची, आयएनएस कोलकाता, आयएनएस तलवार या युद्धनौकांसह इतर नौका मदत कार्यात दाखल झाल्या होत्या. तर नौदलाचे पी ८१ हे विमान तराफ्याच्या क्षेत्रात घिरट्या घालून कर्मचाऱ्यांचा शोध घेत होते.
#WATCH | A crew member of Barge P305 breaks down while speaking of Indian Navy’s rescue operations. He was rescued by INS Kochi and brought to Mumbai.
A total of 184 people have been rescued so far, search and rescue operations are still going on.#CycloneTauktae pic.twitter.com/7e8JU3zcT5
— ANI (@ANI) May 19, 2021
सोमवारी रात्रीपासून हे शोध आणि बचाव कार्य सुरू असून, अद्यापही सुरू आहे. खवळेल्या समुद्रात ही शोध मोहीम राबवत युद्धनौकांनी पी ३०५ तराफ्यावरील १८४ कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढलं. १८४ कर्मचाऱ्यांना घेऊन आयएनएस कोची बुधवारी सकाळी मुंबईच्या किनाऱ्यावर दाखल झाली. त्यानंतर मृत्यूच्या उंबरठ्यावरून परत आलेल्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
किनाऱ्यावर उतरल्यानंतर बस हे कर्मचारी रवाना झाले. पण, तब्बल ११ तास समुद्रात तग धरून भीती दडपून टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. नौदलाचे खूप खूप धन्यवाद! त्यांच्यामुळेच आम्ही जिवंत आहोत, नाहीतरी कुणीच वाचलं नसतं. सगळ्यांची माझ्यासारखीच अवस्था झालेली आहे,” असे सांगताना कर्मचाऱ्यांना भावना अनावर झाल्या होत्या.