नवी दिल्लीे – केंद्र सरकारने एलआयसी मधील आपले समभाग विक्रीला काढण्याचा निर्णय घेतला असून त्यातून सरकारला किमान एक लाख कोटी रूपये निधी जमवण्याची इच्छा आहे. तथापि हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणण्याच्या आधी या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खूष करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यांनी एलआयसीच्या कर्मचाऱ्यांना 25 टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घोषित केला आहे.
तसेच या कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडाही घोषित करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे कर्मचारी या मागण्या करीत होते. त्यांची अखेर पुर्तता करण्याचा निर्णय झाला आहे. सन 2017 पासून कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव प्रलंबीत होता. कर्मचारी संघटनांनी चाळीस टक्के वेतनवाढीची मागणी केली होती. पण 25 टक्के वेतनवाढीवर करार झाला आहे. ही वेतनवाढ त्यांना 1 ऑगस्ट 2017 पासून मिळणार आहे.