बारामती : कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण देशामध्ये जनजीवन विस्कळित झाले आहे, अनेक लोक यामध्ये मृत्यू पावली आहेत. कोरोनाचा जर मुकाबला करायचा असेल तर लसीकरणावर भर दिला पाहिजे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा महिला आघाडी निरीक्षक डॉ.अर्चना पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी डॉ.पाटील म्हणाल्या की वारंवार लॉकडाऊन होत असल्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे, शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे रोजगार यामधे गेलेले आहे, अनेक उद्योग बंद पडण्या च्या मार्गावर आहेत यामधे अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत याचा पण विचार सरकारने केला पाहिजे, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने १८ ते ४५ वयोगटातील लोकांना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली पाहिजे. तरच कोरोना वर आपण लवकर मात करू शकतो. अनेक देशांनी लसीकरण मोठ्या प्रमाणात केल्यामुळे कोरोणाला हद्दपार केले आहे. पण भारतामध्ये लासिकरणावरून राजकारण चालू आहे हे चुकीचे आहे.
आज महाराष्ट्रामध्ये लसीकरणाची खूप विदारक परिस्थिती आहे. हजारो लोकांनी लासिकरणासाठी केंद्रावर रांगा लागलेल्या आहेत. अनेक ठिकाणी लस मिळत नाही. खूप मोठी गर्दी होत आहे. आपापल्या भागातील लोकप्रतिनिधींना येथील लोकांनी लसीकरण सुरळीत व्हावे यासाठी आग्रह धरावा.
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, हॉस्पिटल्स यांना लसिकरणासाठी परवानगी देण्यात यावी. त्यामुळे लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी होईल. त्यामुळे कोरोणाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले तर तर कोरोनाचा प्रसार थांबण्यास मदत होईल. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे. लहान मुलांची ही काळजी घ्यावी असे मत डॉ.अर्चना पाटील यांनी व्यक्त केले.