कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात शनिवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी १२ ते ६ या वेळेत महाविद्यालयीन तसेच खुला गट, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ फेब्रुवारी रोजी लहान गट असे नियोजन करण्यात आले होते. शालेय गटात एकूण १९३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ २ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. “सावरकरांच्या विचारावर प्रेम केलं पाहिजे. सावरकर आणि आंबेडकर जर एकत्र आले असते तर आजचा भारत फार वेगळा असता. संपूर्ण सावरकर समजायला मला दुसरा जन्म घ्यावा लागेल,” अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत मांडले.
प्रथम पारितोषिक हे रोख रुपये ३००० एवढे होते. पारितोषिक मिळालेले विद्यार्थी- प्रथम-भक्ती देशमुख द्वितीय-निनाद कुलकर्णी तृतीय-श्रेयस फाटोळे. “हे वर्ष या स्पर्धेचे ३७ वे वर्ष असून अखंडपणे ही स्पर्धा सावरकरांचे विचार तरुणांनी अभ्यासावेत याकरिता घेतली जाते” असे संयोजकांनी सांगितले.
– निनाद कुलकर्णी,
कॉलेज रिपोर्टर,
आबासाहेब गरवारे कॉलेज ,पुणे