कोल्हापूर- लाॅकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बील माफ करा या मागणीसाठी येत्या २७ ॲाक्टोंबरला राज्यभर महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलीय. ते कोल्हापूरात बोलत होते.
दरम्यान लॉक डाउन मधील घरगुती वीज बिल माफ व्हावं म्हणून यापूर्वी अनेक वेळा आम्ही सरकारला विनंती केली आहे. मात्र अद्यापही ठोस निर्णय न झाल्याने आम्हाला आंदोलनाचे पाऊल उचलावं लागलं आहे असे शेट्टी म्हणाले