नवी दिल्ली : एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात मानवतावादी कार्यकर्ते गौतम नवलखा तयांना 15 ऑक्टोबर पर्यंत अटक करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायलयाने शुक्रवारी दिले.
न्या. अरूण मिश्रा आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्याविरोधात गोळा केलेले पुरावे 15 ऑक्टोबरपुर्वी सादर करण्याचे आदेश दिले. एल्गार परिषदेत केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे कोरेगाव भीमा येथील दंगल उसळली. तसेच नवलखा यांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत, असे गुन्हे त्यांच्यावर नोंदवले. त्याला आक्षेप घेत मी मानवतावादी कार्यकर्ता म्हणून काही दशके काम करत आहे.राजकीय मुद्द्यांवर माझी परखड मतेमांडण्याचा मला अधिकार आहे. तसेच 2011मध्ये सरकारी अधिकाऱ्यांचे नक्षलींनी अपहरण केले तेव्हा मध्यस्थीसाठी मला सरकारने निमंत्रित केले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.