ओडिशा – ओडिशात महिन्याभरापूर्वी आलेल्या वादळानंतरही लोकांचे जीवन अद्याप सुरळीत झालेले नाही. राज्याच्या किनारी भागांमध्ये राहणाऱ्या सुमारे 1 लाख 62 हजार परिवारांच्या 5 लाखांहून अधिक लोक काळोखात राहात आहेत. 3 मे रोजी आलेल्या वादळामुळे केवळ पुरी जिल्हयातील 1 लाख 51 हजार 889 लोक अद्यापही वीजसेवेपासून वंचित आहेत.
दरम्यान, ओडिसासह आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना मागच्या महिन्यांत ‘फनी’चा फटका बसला होता. ‘फनी’ चक्रीवादळ दरम्यान जवळपास 12 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं, तरीही ओडिसातील फनी चक्रीवादळामुळे 34 पेक्षा अधिकजण मृत्यूमुखी पडले होते.