सातारा – सातारा जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील निवडणुकांचा माहोल सुरू झाला आहे. पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या भुईंजच्या किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्यानंतर आता सातारा तालुक्यातील अजिंक्यतारा, कराड तालुक्यातील रयत-अथणी शुगर व पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार आहे. विभागीय आयुक्त तथा साखर सहसंचालकांकडून या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर आता साखर कारखान्यांमधील राजकीय लढाई सुरू झाली आहे. वाई तालुक्यातील किसनवीर सहकार साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम आधीच सुरू झाली आहे. या कारखान्याच्या 21 जागांसाठी 3 मे रोजी मतदान होणार आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 28 मार्चपासून सुरू झाली आहे. या कारखान्याच्या आखाड्यात पॅनेल उतरवण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतल्याने, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई रंगणार आहे. शिवसेनेनेसुद्धा या उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या त्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रांमध्ये या नेत्यांची रणनीती महत्त्वाची ठरणार आहे. गत निवडणुकीत शंभूराज देसाई यांनी सत्यजित पाटणकर यांच्या पॅनेलला टक्कर देऊन निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवले होते. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत गृह राज्यमंत्र्यांचा पराभव झाला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही तालुक्यात देसाई गटाला संमिश्र यश मिळाले. त्यामुळे यंदा कारखाना निवडणुकीमध्ये देसाई गटाला मजबूत मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे व ऍड. उदयसिंह हेदेखील त्यांच्या नेतृत्वाखालील कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करतील.
सातारा तालुक्याच्या राजकारणात खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यात राजकीय वर्चस्वाची लढाई नेहमीच असते; परंतु कारखान्याच्या निवडणुकीत उदयनराजे पॅनेल उतरवणार का, हा चर्चेचा विषय आहे. ऍड. उदयसिंह पाटील यांनी जिल्हा बॅंकेच्या रणांगणात आपली ताकद आजमावली. त्यांच्या राजकीय धाडसाचे कौतुक झाले. त्याच पद्धतीने त्यांना कारखाना निवडणुकी राजकीय मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. या तीन कारखान्यांच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय हालचाली 10 एप्रिलनंतर सुरू होतील, असा अंदाज आहे.
पुढील महिन्यांमध्ये (1 एप्रिलनंतर) साखर संचालक कार्यालयाकडून सातारा तालुक्यातील अजिंक्यतारा, पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई व कराड तालुक्यातील रयत-अथणी या सहकारी साखर कारखान्यांच्या कारखान्यांच्या निवडणुकांचचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. विभागीय आयुक्तांनी अधिकृत घोषणा केली नसली, तरी प्रादेशिक कार्यालयाला या कारखान्यांच्या निवडणुकांसंदर्भात सतर्क करण्यात आले आहे; परंतु या संदर्भात आयुक्त कार्यालयाकडून कोणतीही सूचना आली नसल्याचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मनोहर माळी यांनी सांगितले. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर या जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांशी संबंधित हे कारखाने आहेत.
त्या त्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रांमध्ये या नेत्यांची रणनीती महत्त्वाची ठरणार आहे. गत निवडणुकीत शंभूराज देसाई यांनी सत्यजित पाटणकर यांच्या पॅनेलला टक्कर देऊन निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवले होते. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत गृह राज्यमंत्र्यांचा पराभव झाला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही तालुक्यात देसाई गटाला संमिश्र यश मिळाले. त्यामुळे यंदा कारखाना निवडणुकीमध्ये देसाई गटाला मजबूत मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे व ऍड. उदयसिंह हेदेखील त्यांच्या नेतृत्वाखालील कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करतील. सातारा तालुक्याच्या राजकारणात खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यात राजकीय वर्चस्वाची लढाई नेहमीच असते; परंतु कारखान्याच्या निवडणुकीत उदयनराजे पॅनेल उतरवणार का, हा चर्चेचा विषय आहे. ऍड. उदयसिंह पाटील यांनी जिल्हा बॅंकेच्या रणांगणात आपली ताकद आजमावली. त्यांच्या राजकीय धाडसाचे कौतुक झाले. त्याच पद्धतीने त्यांना कारखाना निवडणुकी राजकीय मोर्चेबांधणी करावी लागणार आहे. या तीन कारखान्यांच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय हालचाली 10 एप्रिलनंतर सुरू होतील, असा अंदाज आहे.