मुंबई – भाजप-शिवसेना बहुमत सिद्ध करू शकले नाहीतर आम्ही सरकार स्थापनेचा प्रयत्न करू, असे वक्तव्य राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी केले आहे. निवडणूकीचा निकाल लागून आठवडा उलटला असला तरीही सरकार स्थापन करण्यावरून शिवसेना आणि भाजपातील वाटाघाटीवर अजूनही कोणताही तोडगा निघाला नाही. महायुतीकडे बहुमत असतानाही सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात आलेला नाही.
सध्या सत्ता स्थापनेवरून सुरु असलेल्या गोंधळावर बोलताना नवाब मलिक यांनी म्हंटले कि, भाजप-शिवसेनेला महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन करण्याचा जनतेचा कौल मिळाला आहे. त्यांनी सरकार बनवावे आणि सभागृहावर बहुमत सिद्ध करावे अशी आमची इच्छा आहे. जर ते बहुमत सिद्ध करु शकले नाहीत तर आम्ही नक्कीच सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.
NCP leader Nawab Malik: BJP-Shiv-Sena have got people’s mandate to form a stable govt in Maharashtra. We want them to form govt and prove majority on the floor of the House. If they are not able to prove majority, then, we will certainly try to form government. #Maharashtra pic.twitter.com/wIBsBCJGfE
— ANI (@ANI) November 1, 2019