मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत मिळाले आहे. जरी हे बहुमत मिळाले असले तरी या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून युद्ध रंगले आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तासाभराच्या बैठकीनंतर राज्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर ठाम मत झाले. तसेच सत्तास्थापनेचं सूत्र भाजपाने लेखी स्वरूपात द्यावे, अशी मागणीही आमदारांनी केली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले असून भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. यानंतर आज दुपारी मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडणार पडली. या बैठकीत सत्तेचे समसमान वाटप करण्यात यावं. सत्तास्थापनेचं सूत्र भाजपाने लेखी स्वरूपात द्यावे. तसेच सत्ता स्थापनेचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील, असे ठरवण्यात आले आहे.
शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक म्हणाले कि, यापूर्वी आमची भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. राज्यात अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यावरही चर्चा करण्यात आली होती. आमच्यासाठी मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील समसमान वाटा महत्त्वाचा आहे. उपमुख्यमंत्रीपद हे आमच्यासाठी दुय्यम आहे. सत्तास्थापनेचं सूत्र भाजपानं लेखी स्वरूपात दिल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच सत्ता स्थापनेचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे असून ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असेही त्यांनी सांगितले.
Pratap Sarnaik,Shiv Sena:In our meeting it was decided that like Amit Shah ji had promised 50-50 formula before LS polls,similarly both allies should get chance to run Govt for 2.5-2.5 years so Shiv Sena should also have CM.Uddhav ji should get this assurance in writing from BJP. pic.twitter.com/vyaFL1dVV4
— ANI (@ANI) October 26, 2019