Election Result 2023 – मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा फटका बसला सत्ताविरोधी लाट असतानाही भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापनेच्या मार्गावर आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या पराभवामागे कोणती कारणे प्रभावी ठरली, याचा हा आढावा…
गटबाजीमुळे मोठा फटका
यावेळी मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या गोटात मोठी गटबाजी पाहायला मिळाली. बंडखोर काँग्रेस नेतृत्वाला थेट आव्हान देताना दिसत होते. अनेक जागांवर काँग्रेस आपल्याच बंडखोरांविरुद्ध संघर्ष करताना दिसली. भाजप नेते कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यातील अंतर्गत भांडणाचा आरोप करताना दिसले.
इतकंच नाही तर गंभीर मुद्द्यांवर कमलनाथ आणि दिग्विजय यांच्या वक्तव्यातही फरक होता. स्वतःला एकजूट दाखवण्याऐवजी काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधियांवर टीका करून शक्ती खर्च करताना दिसले.
गॅरंटीवर विश्वास निर्माण करता आला नाही
काँग्रेसने जाहीरनाम्यात १२०० हून अधिक आश्वासने दिली होती. तरीही लोकांचा विश्वास संपादन करण्यात ते अपयशी ठरले. यापूर्वीच्या कमलनाथ सरकारचा कारभार लोकांनी पाहिला होता. भाजप नेते कमलनाथ आपल्या आश्वासनांपासून मागे जात असल्याचा आरोप करत राहिले.
कमलनाथ यांच्या सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले. त्याचवेळी काँग्रेस नेत्यांना त्यांच्या आश्वासनांवर जनतेचा विश्वास जिंकण्यात यश आले नाही. त्यांनी दिलेली आश्वासने नक्कीच पूर्ण होतील, हे ते जनतेला पटवून देऊ शकले नाहीत.
नेतृत्वात आत्मविश्वासाचा अभाव
काँग्रेसच्या राज्य युनिटच्या वतीने कमलनाथ यांची राज्याचा चेहरा म्हणून वर्णी लागली. राहुल गांधी यांचा चेहरा केंद्रीय नेता म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झाला. दुसरीकडे भाजपने आपला मुख्यमंत्री चेहरा जाहीर केलेला नाही. भाजपने संपूर्ण निवडणूक मोदींच्या चेहऱ्यावर लढवली.
मोदींच्या व्यक्तिमत्त्वाचा लोकांवर प्रभाव पडला. मोदींच्या तुलनेत राहुल यांची प्रतिमा प्रभावी ठरली नाही. शिवराजांच्या मागे भाजपची संपूर्ण फौज दिसत होती. केंद्र मागे उभे होते, तर दुसरीकडे कमलनाथ स्वबळावर संघर्ष करताना दिसत होते.
काँग्रेसचा कमकुवत प्रचार
राज्यातील काँग्रेसचा प्रचार क्षीण दिसत होता. काँग्रेसचा मैदानावरील प्रचार लोकांना प्रभावित करू शकला नाही, असे निवडणूक विश्लेषकांचे म्हणणे आहे. काँग्रेस सोशल मीडियावर लक्ष केंद्रित करताना दिसली. तळागाळातील मतदारांशी संपर्क साधण्यात काँग्रेसला यश आले नाही.
पक्षाला थेट मतदारांपर्यंत पोहोचायचे होते, मात्र उमेदवारांवर अवलंबून राहिले. केंद्रीय नेतृत्वानेही संपूर्ण प्रचार कमलनाथ यांच्यावर सोडला. दुसरीकडे निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले होते.
बेताल वक्तव्ये भोवली
राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यामुळेही जनतेवर चुकीची छाप पडली. मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते व्यासपीठावरून अधिकाऱ्यांना उघडपणे इशारे देताना दिसले. इतकेच नव्हे तर काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनीही बेताल वक्तव्ये केली ज्याचा निवडणुकीशी काहीही संबंध नव्हता.
या विधानांमध्ये काही अर्थ नव्हता. राहुल गांधींचे पनौती वक्तव्य व्हायरल झाले. तर दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे विधान- मोदी हे लबाडांचे नेते आहेत- हे विधानही चर्चेत होते. या विधानांचा उल्लेख करून भाजप नेते लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत होते आणि काँग्रेस नेत्यांना अहंकारी ठरवत होते.