मुंबई – शिवसेना पक्षाच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या आधी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाचा या विषयावर निर्णय आल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
आज एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाने शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह अद्याप वापरलेले नसताना निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह का गोठवले, असा सवालही केला.
देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार – उपमुख्यमंत्री फडणवीस
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयात आधी निर्णय झाल्याशिवाय निवडणूक आयोगाला यावर आपला निर्णय देता येणार नाही. सर्वोच्च न्यायालय 14 फेब्रुवारीपासून बंडखोर आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित प्रकरणावर दररोज सुनावणी घेणार आहे.