आज सकाळी 7 वाजल्यापासून ते पुढील महिन्याच्या 29 तारखेला साडे 7 वाजेपर्यंत मतदानोत्तर कलचाचणी घेण्यास आणि तिचे निकाल जाहीर करण्यास निवडणूक आयोगानं बंदी जाहीर केली आहे. आसाम, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुदुच्चेरी इथली विधानसभा निवडणूक आणि विविध राज्यातल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, कलचाचणी घेऊन तिचे निकाल वर्तमानपत्रे, वाहिन्या आणि इतर कोणत्याही माध्यमातून प्रसिद्ध करण्यास मनाई करण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.
याशिवाय, मतदान असलेल्या भागांमध्ये मतदानाच्या 48 तास आधी इतर कोणतीही कल चाचणी किंवा सर्वेक्षण घेण्यास आणि त्याचे निकाल प्रसिद्ध करण्यास आयोगानं मनाई केली आहे.