Eknath Khadse । निवडणुकीनंतर समोर आलेल्या एक्झिट पोलवर राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलीय. त्यानुसार राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पोलचा निकाल पाहता एनडीएला 350 च्या वर जागा मिळतील अशी चिन्हे असल्याचे वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं. राज्यात फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला हे फारसे रुचलेल दिसत नसल्याचं पाहायला मिळत असल्याचे खडसे म्हणाले.
साडेतीनशे जागांचा टप्पा पार होईल Eknath Khadse ।
लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत. या संदर्भात राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही विकासकामं केली आहेत, ते पाहता जनतेने त्यांना पुन्हा एकदा पाठींबा दिल्याचं पाहायला मिळत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. चारशे पार होईल अशी आपल्याला अपेक्षा नव्हती. मात्र साडेतीनशे पार होईल हा विश्वास होता. पोलचां निकाल पाहता साडेतीनशे वर जागा मिळतील अशी चिन्हे आहेत असंही खडसे म्हणाले.
विधानसभेसाठी महायुतीनं आत्मचिंतन करावं
राज्यात मात्र फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला हे फारसे रुचलेल दिसत नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं काही जागा कमी झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
रक्षा खडसे निवडूण येतील Eknath Khadse ।
घरातील महिलांनी तुतारीचा प्रचार केला असला तरी कमळाला मतदान केल्याचे रक्षा खडसे यांनी वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचे एकनाथ खडसे यांनी खंडन केले आहे. रोहिणी खडसे यांनी उन्हा तन्हात फिरुन त्यांनी त्यांच्या पक्षासाठी काम केले आहे. त्यामुळं लोक त्यांच्या पक्षाला मतदान करणार हे निश्चित असल्याचे खडसे म्हणाले. त्यामुळं रक्षा खडसे यांच्या मताशी आपण सहमत नसल्याचे खडसे यांनी म्हटलं आहे. रक्षा खडसे चांगल्या मतांनी निवडूण येतील असेही खडसे म्हणाले.